Ind vs Aus 3rd ODI Sunil Gavaskar: बुधवारी भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यासह भारतीय संघाला मायदेशात खेळताना २-१ ने मालिका गमवावी लागली आहे. ही आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी शेवटची मालिका होती.
दरम्यान या मालिकेतील पराभवानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी मोठे वक्तव्य केले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकरांनी म्हटले की, ' त्यांनी जो दबाव टाकला त्यामुळे भारतीय फलंदाजांना एक धाव घेणंही काठी झालं होतं. ज्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी तुम्ही अशा चुका करता आणि चुकीचे शॉट खेळता. जे शॉट्स खेळायची तुम्हाला सवय नसते. ही अशी गोष्ट आहे ज्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आता आयपीएल सुरु होणार आहे आता ही गोष्ट मुळीच विसरायला नको. भारतीय संघाने अनेकदा या चुका केल्या आहेत. मात्र यावेळी या चुका सावरणं गरजेचं आहे. कारण यावेळी वर्ल्ड कप भारतात होणार आहे.' (Latest sports updates)
तसेच ते पुढे म्हणाले की,' सलामी जोडी, विराट कोहली आणि केएल राहुलची भागीदारी वगळली तर इतर कुठल्याही फलंदाजांना भागीदारी करता आली नाही. रोहित शर्मा अन्नू गिलने ६५ धावा जोडल्या होत्या. तर विराट कोहली आणि राहुलने ६९ धावांची भागीदारी केली. जेव्हा तुम्ही २७० धावांचा पाठलाग करताय त्यावेळी एका तरी जोडीने ९०-१०० धावांची भागीदारी करणं गरजेचं होतं. मात्र असं काहीच झालं नाही.
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २७० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव ४९.१ षटकात २४८ धावांवर संपुष्ठात आला.
विराट कोहलीची ५४ आणि हार्दिक पंड्याची ४० धावांची खेळी वगळली,तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या पराभवासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गमावली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.