अलीकडेच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये (WTC Finals) टीम विराटच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधार पदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विराट कोहली कधी आयसीसीची एखादी स्पर्धा जिंकणार असा प्रश्न आता क्रिक्रेटचे चाहते विचारत आहेत. काहीजण म्हणतात की विराट हा भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे, परंतु दुसरा वर्ग म्हणतो विराटने त्याचा गुरु धोनी सारखी एकदा तरी आयसीसी ट्राफी जिंकली पाहीजे. परंतू आता या वादात सुरेश रैनाने उडी मारली आहे, आणि विराट कोहलीच्या कर्णधार पदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
एका खासगी वाहिनीशी संवाद साधताना विराट कोहलीच्या कर्णधारपदावर बोलताना रैना म्हणाला ''कोणत्याही कर्णधाराला थोडा जास्त वेळ देण्याची गरज आहे. माझा असा विश्वास आहे की तो पहिल्या क्रमांकाचा कर्णधार आहे आणि मला खात्री आहे की तो एक दिवस त्याच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीत आयसीसीची करंडक जिंकेल. विराटचे रेकॅार्ड त्याची आतापर्यंतची कामगिरी सांगत आहेत. माझा विश्वास आहे की तो जगातील प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे''.
आपला मुद्दा पुढे ठेवत रैना म्हणाला आपण आयसीसी ट्रॉफीविषयी बोलत आहात, पण हेही सत्य आहे की त्याच्या नेतृत्वाखाली संघासाठी तो एकाही आयपीएल किताब जिंकू शकत नाही. मला वाटते की त्याला थोडा वेळ देणे आवश्यक आहे. तथापि, रैनाचा हा मुद्दा न समजण्याजोग्या आहे, कारण कोहली जवळपास एक दशकासाठी बंगळुरूची धुरा सांभाळत आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की या सर्व काळा नंतर काय म्हटले पाहिजे? शेवटी, कोहली किती वेळ घेईल? रैना म्हणाला की, सध्या दोन-तीन विश्वचषक वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एकामागून एक घेण्यात येत आहेत.
रैना पुढे म्हणाला की, नुकताच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारत पराभूत झाला आहे. हे परिस्थितीमुळे नाही तर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. सामन्याचे दोन दिवस पूर्ण पावसाने न्हाऊन गेले. चार सत्रांसाठी फलंदाजीची गरजेची होती. परंतु, भारतीय फलंदाज अपयशी ठरले. माजी फलंदाज म्हणाला की, सिनीयर फलंदाजांना अधिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.