Team India: भारतीय संघ येत्या काही दिवसात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. भारत - वेस्ट इंडिज मालिकेची सुरुवात येत्या १२ जुलैपासून होणार आहे.
या दौऱ्यावर भारतीय संघाला २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. वनडे मालिकेला १२ जुलैपासून तर टी-२० मालिकेला २७ जुलै आणि ३ ऑगस्टपासून कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज होऊ शकते भारतीय संघाची घोषणा..
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. असे म्हटले जात होते की, रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र तो देखील या मालिकेत खेळताना दिसून येणार आहे.
तसेच केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराहचं देखील कमबॅक होणं कठीण दिसून येत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सरफराज खानला संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)
BCCI कडून मोठी माहिती आली समोर..
युवा फलंदाज सरफराज खानने रणजी ट्रॉफी २०२२-२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने ६ सामन्यांमध्ये ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ३ शतके आणि १ अर्धशतक झळकावले होते. १६२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.
सरफराज खानने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३७ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ७९.६५ च्या सरासरीने ३५०५ धावा केल्या आहेत. त्याचा हा दमदार रेकॉर्ड पाहून त्याला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रोहित शर्मा पूर्णपणे फिट असून तो सिलेक्शनसाठी उपलब्ध असणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.
त्याला नंतर विश्रांती देण्याचा विचार केला जाईल.' रोहित शर्मा हा गेल्या काही महिन्यांपासून आउट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे रोहितचा फॉर्म परतण्यासाठी रोहित या दौऱ्यावर खेळताना दिसून येऊ शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.