Yuvraj Singh On IPL Fight: 'थंड घ्या भावांनो..', विराट - गंभीर वादात आता सिक्सर किंगची उडी,म्हणाला...

Yuvraj Singh On Virat Kohli -Gautam Gambhir Fight: आता माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे.
yuvraj singh
yuvraj singh saam tv

Yuvraj Singh Tweet: भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये. ३ दिवसांपूर्वी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद रंगला होता.

लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. या वादात अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली मतं मांडली आहेत.

दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे.

yuvraj singh
IPL 2023 RR Vs GT: गुजरात घेणार का पराभवाचा बदला? जाणून घ्या कशी असेल RR vs GT सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग 11

विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या वादात आता युवराज सिंगने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एक ट्विट करत दोघांची फिरकी घेतली आहे. त्याने एका कोल्ड ड्रिंक ब्रँडला टॅग करत लिहिले की, 'मला वाटतं गौती आणि विराटला या ब्रँडने आपल्या कॅम्पेनसाठी साइन करावं.' मुख्य बाब म्हणजे त्याने या ट्विटमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीरला टॅग केलं आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (Latest sports updates)

युवराज सिंग हा आपल्या मजेशीर स्वभावामुळे ओळखला जातो. मैदानात तो आक्रमक खेळी करताना दिसून यायचा. मात्र मैदानाबाहेर तो नेहमीच मस्ती करताना दिसून आला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो सोशल मीडियाचा वापर करून आपल्या संघातील सहकाऱ्यांची फिरकी घेत असतो. आता विराट आणि गंभीर या ट्विटला काय प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

yuvraj singh
Virat Kohli-Gautam Gambhir : गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर १.०७ कोटींचा दंड विराट कोहली भरणार नाही, कारण...

काय आहे प्रकरण?

तर झाले असे की, १ मे रोजी लखनऊच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. हा सामना सुरु असताना, विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.

हा सामना झाल्यानंतर जेव्हा खेळाडू हात मिळवणी करत होते, त्यावेळी देखील या दोघांमध्ये बाचाबाची सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान या प्रकरणात गौतम गंभीरने उडी घेतल्याने हा वाद आणखी वाढला. नवीन उल हकनंतर विराट आणि गंभीर यांच्यात वाद रंगला. संघातील खेळाडूंनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद जास्त वाढला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com