जालना : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा निंर्णय राज्य सरकारने State Government घेतला असून, लसींची उपलब्धता यात सर्वात आव्हानात्मक बाब असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात Jalna बोलत होते. मात्र, ज्या लसी उपलब्ध आहे त्यानुसार लसीकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. कोविशील्डकडून १३ लाख लसीचे पत्र राज्य सरकारला मिळले आहे. The state government will vaccinate as per the rules of the center
कोव्हॅकसीनकडून ३ लाख ५७ हजार लसींची उपलब्धता आहे. अशा १८ लाख लसी उपलब्ध असून, त्यावरूनच तातडीने लसीकरणाचा निर्णय सरकारने घेतल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
मोठ्या शहरांना २० हजार तर, मध्यम शहरांना साडेसात हजार आणि अति लहान शहरांना ५ हजार लसी देण्यात आल्या आहे. हे लसीकरण ७ दिवस पुरतील असं नियोजन आरोग्य विभाग करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
लसींचासाठा कमी असल्याने मुंबईत Mumbai ३ दिवसांपासून लसीकरण Vaccination बंद असून, सध्या ते बंदच ठेवावं लागेल. शिवाय लसी कमी पडणार नाहीत. याकरिता प्रयत्न सुरूच राहणार असून, आज प्राथमिक स्वरूपात लसीकरण होणार आहे. पुढचे ७ दिवस लसीकरण योग्य प्रकारे होईल असंही त्यांनी अंदाज वर्तवला आहे. The state government will vaccinate as per the rules of the center
राज्य सरकार केंद्राच्या नियमांनुसारच लसीकरण करेल, असेही टोपे यांनी यावेळी सांगितलं आहे. कोरोनाचा Corona संसर्ग कमी होण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये Lockdown १५ दिवसांची वाढ केली आहे. सरकारने घालून दिलेले नियम नागरीकांनी पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.