अमर घटारे
अमरावती : अमरावती जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा काढला. परंतु, पीक विम्याची (Crop Insurance) रक्कम मिळाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून पीज विमा कार्यालयाची तोडफोड केली. (Tajya Batmya)
प्रधानमंत्री पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा करून अल्प रक्कम शेतकऱ्यांच्या (farmer) खात्यात टाकली. तर हजारो शेतकरी अद्यापही पीक विमापासून वंचित आहेत. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (Amaravati) अमरावती येथील राणा कॉम्प्लेक्समधील प्रधानमंत्री पिक विमा कार्यालयात जाऊन कंपनीला जाब विचारला.
खुर्च्याची तोडफोड
योग्य प्रतिसाद सकारात्मक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांनी आक्रमक पवित्रा घेत पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्याची तोडफोड केली. यावेळी आठ दिवसात जर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम मिळाली नाही. तर पिक विमा कार्यालय पेटवून देण्याचा इशारा देण्यात आला. तर यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पिक विमा कंपनीच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.