ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्नानंतर पुरूष असो स्त्रिया प्रत्येकाच्या स्वभावात बदल हा जाणवतो.
लग्नानंतर नवीन नाते जोडले असल्याने नात्याप्रमाणे राहणे साहजिकच नवीन असते.
नात्यात बरेच चढ- उतार येत असल्याने फार धैर्याने काम करावे लागते.
अनेकदा बोलले जाते की लग्नानंतर स्त्रियांची चिडचिड होते, मात्र यामागील कारण काय आहे हे जाणून घ्या
मुली आपलं घर सोडून नव्या घरात येतात, या घरात राहताना त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
लग्नानंतर मुलीच्या अनेक सवयीमध्ये बदल होतो, खाण्यापिण्याच्या सवयी बदल्याने देखील चिडचिड वाढते.
मुलीने ठरवल्याप्रमाणे सासरी तिला प्रेम मिळत नसेल तर लग्नानंतर चिडचिड होते.
लग्नानंतर महिलांच्या मनस्थितीत बदल होतात. यासाठी काही सामाजिक पैलू जबाबदार असतात, तर काही हार्मोनल चेन्जेस देखील यासाटी कारणीभूत ठरतात.
बरेचदा अगोदर माहित नसल्याने पतीच्या काही सवयीने देखील महिला चिडचिड्या होतात.