ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन.
या दोन व्यक्तींमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नवी नाती फुलतात.
लग्नानंतर ओढ, प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आतुरता या गोष्टी नात्यात येतात.
यामुळेच लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना नेमके काय हवे असते, हे जाणून घ्या.
दोघांमध्ये संवाद होणे गरजेचे असते. कारण पती-पत्नीला सर्वच गोष्टी नव्या असतात. त्यात मुलगी आपले घर, आपली माणसे सोडून नवीन घरी आलेली असते. त्यामुळे मुलीला सुरुवातीला आपला नवरा हा एकच आपला हक्काचा व्यक्ती वाटत असतो.
लग्नानंतर मुलगी आपले घर, आपली माणसे सोडून नवीन घरी आलेली असते. त्यामुळे नवऱ्याने देखील तिला समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असते. यामुळे पतीने देखील तिला मैत्रिणीची वागणूक देऊन तिच्याशी संवाद साधावा.