साम टिव्ही ब्युरो
मराठी सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांनी एकमेकांशी लग्न केले आहे.
सिनेमासृष्टीत अश्या अनेक जोड्या आहेत ज्यांनी सिनेकरिअर करतानाच जोडीदार निवडला आहे.
छोट्या पडद्यावरील बरेच कलाकार प्रेमामध्ये अडकले गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड बनले
मात्र त्यांच्या प्रेमाने एक यशस्वी टप्पा देखील पार करत लगीनगाठही बांधली
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली जोडी पाठक बाई आणि राणा दा, म्हणजेच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी.
खऱ्या आयुष्यातही ही जोडी एकमेकांची जिवनसाथी बनली आहे. नुकतेच या दोघांचे लग्न झाले आहे.
विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे मराठी सिनेमासृष्टीतील कलाकार लगीन बेडीत अडकलेत.
'पुढचं पाऊल' मालिकेच्या माध्यमातून एकमेकांशी झालेली ओळख, नंतर मैत्री आणि त्याच मैत्रीचं प्रेमात झालेलं रुपांतर...
बिग बॉसच्या घरात नात्याची कबुली देत आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील लग्नबंधनात अडकले.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी सिनेइंडस्ट्रीमधली एक क्यूट कपल आहे