Chandrakant Jagtap
हिंदू धर्मातील मान्यतांनुसार सायंकाळनंतर नखं कापणं शुभ मानलं जातं नाही.
धार्मिक मान्यतांनुसार सायंकाळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि सुख समृद्धीचा आशिर्वाद देण्यासाठी घरातच निवास करते.
त्यामुळे सायंकाळनंतर नखं किंवा केस कापणं शुभ मानलं जातं नाही.
याशिवाय रात्री कचरा गोळा करणे किंवा कुणाला पैसे देणे देखील शुभ मानले जात नाही.
अशी देखील मान्यता आहे की नखं कपाल्यानंतर ते घरात किंवा बेडवर टाकू नये.
एका मान्यतेनुसार नखं कापल्यानंतर ते अशा जागी फेकावे जिथे क्वचितच कोणाची नजर जाईल.
काही लोकांचा असा समज आहे की नखांचा वापर जादूटोना करण्यासाठी केला जाऊ शकतो.
टीप - या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे मान्यतांवर आधारित आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.