
Chanakya Niti : चाणक्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या ज्याच्या आपल्या भूतकाळाशी संबंध आहे. त्यांनी सांगितले की, मागच्या जन्मातल्या कर्माच्या आधारे मनुष्याला वर्तमान जन्मात असे ५ सुख प्राप्त होतात, ज्यामुळे त्याचे जीवन सफल होते. ते पाच सुख कोणते आहेत ते जाणून घेऊया.
1. जीवनसाथी -
या कलियुगात चांगला नवरा किंवा पत्नी मिळणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. चाणक्य सांगतात की, ज्यांनी मागील जन्मी चांगले कर्म केले त्यांनाच योग्य जीवनसाथी मिळतो. जो मरेपर्यंत सुख-दु:खात खांद्याला खांदा लावून उभा असतो.
2. मनी (Money) मॅनेजमेंट -
जर तुम्हाला तुमचा आज आणि भविष्यकाळ सुरक्षित आणि आनंदी बनवायचा असेल तर तुमच्याकडे पैशाचा योग्य वापर करण्याची बुद्धी असायला हवी. प्रत्येकाकडे पैसा असतो पण त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते. पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे ज्यांना माहीत आहे, ते तारुण्यात तसेच वृद्धापकाळातही आनंदाने जगतात.
3. दानाची भावना -
पाई टू पाई जोडत राहणे ही चांगली सवय आहे, परंतु चांगल्या आणि गरजूंना मदत करणे, दानाची भावना असणे जीवन आनंददायक बनवते. दानाने पैसा कमी होत नाही तर दुप्पट होतो.
5. कामावर नियंत्रण -
आचार्य चाणक्य सांगतात की, चांगले काम करण्याची शक्ती असलेले लोक भाग्यवान देखील असतात. ज्या व्यक्तीला लैंगिक शक्ती कशी नियंत्रित करायची हे माहित असते, तो जीवनात नेहमी आनंदी असतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.