Pandharpur News : राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. राज्यभरात वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जनावले देखील दगावल्याची माहिती आहे. पंढरपुरात केसकरवाडी गावात नारळाच्या झाडावर वीज कोसळली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
दोन दिवसांपासून पंढरपूर परिसरात वादळी वारे व अवकाळी पाऊस सुरू आहे. रात्री पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथे एका शेतकऱ्याच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला आणि झाड जळून खाक झालं. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. तर ईश्वर वठार गावातही वीज पडून एका शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)
अवकाळी पावसाचा बार्शीतील द्राक्ष बागांना फटका
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेलगाव गावात द्राक्षाची बागांचं मोठं नुकसान झालं आहे.
द्राक्ष बागायतदारांवर मोठं संकट यामुळे उभं राहिलं आहे. अनेक द्राक्षबागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्या आहेत. प्रशासनाने आता तात्काळ पंचनामे करून न्याय देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.