
Devendra Fadnavis News: आम्ही विरोधकांना माफ केलं आणि कटुता संपवली असं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विरोधकांनी आम्हाला खूप त्रास दिला, त्याचा बदला घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. मात्र आता आम्ही सर्व विरोधकांना माफ केलं, हाच आमचा बदला आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबईमध्ये धूलिवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान माध्यामांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 'मी विधानसभेत बोलताना म्हटलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला, त्या सर्व लोकांचा आम्ही बदला घेऊ आणि आमचा बदला हा आहे की आम्ही सर्वांना माफ केलं. आता आमच्या मनात कोणताही कटूता नाही' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
संजय राऊत यांना टोला
यावेळी फडणवीस यांनी संजय राऊतांना देखील टोला लगावला आहे. 'मला फक्त एक दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे. आपल्याकडे होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. परंतु काही लोक 365 दिवस जे शिमगा करतात, त्यांना मला एकच सांगायचं आहे. एक दिवस ठिक आहे, उरलेले 364 दिवस आपण सभ्य माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर उत्तम होईल (Latest Marathi News)
उद्धव ठाकरेंना कटुता संपवण्याचं आवाहन?
आमच्या मित्रांना खोटं सांगून भांग पाजली होती असे म्हणत त्यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे यांना देखील कटूता संपवण्याचे अप्रत्यक्ष आवाहनच केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या आवाहनाला उद्धव ठाकरे साद देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान यापूर्वी देखील आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या शत्रुत्व नाही असे विधान केले होते. (Latest Political News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.