
सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने मिरची आणि कापसाचे उत्पन्न घेतले जात असते. मात्र मिरचीला आणि कापसाला (Cotton) योग्य हमीभाव मिळत नसल्याने (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरणार आहे. (Tajya Batmya)
सध्याच्या शिंदे– फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या (Farmer) बाजूने असल्याचा एकीकडे दावा करत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती झाली आहे. मात्र राज्य सरकार या गोष्टींकडे लक्ष देताना दिसून येत नाही आहे.
तर रस्त्यावर उतरून आंदोलन
व्यापारी मनमानी भावाने खरेदी करत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे लवकर लक्ष नाही दिले; तर राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.