>>अभिजीत देशमुख
MLA Ganpat Gaikwad: कल्याणमध्ये पैसे भरूनही वीज कनेक्शन मिळत नसल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. याबबात कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
सहा महिन्यापूर्वी पैसे भरूनही वीज कनेक्शन न मिळाल्याने कल्याण पूर्व आशाळे परिसरातील काही इमारतींमधील रहिवाशांना अंधारात राहावे लागत आहे. यासंदर्भात कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. (Mumbai News)
जोपर्यंत या रहिवाशांना वीज पुरवठा होत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली. टेबल खालून पैसे घेतलेल्यांना मीटर देण्यात येते आणि सरकारी नियमानुसार ज्यांनी पैसे भरले त्यांना मीटर दिले जात नाही असा गंभीर आरोप यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी केला. (Latest Marathi News)
आपल्याकडे याबाबतचा व्हिडिओ आसल्याचा दावा देखील त्यांनी केला. यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल आणि या रहिवाशांना तत्काळ वीज कनेक्शन देण्यात येईल असे आश्वासन दिले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.